मंत्री गोगावलेंचा ‘अघोरी’प्रताप, राऊतांनी केली CM फडणवीसांची कानउघडणी…’खुर्चीखाली वाकून पाहा’

मंत्री गोगावलेंचा ‘अघोरी’प्रताप, राऊतांनी केली CM फडणवीसांची कानउघडणी…’खुर्चीखाली वाकून पाहा’

Sanjay Raut Criticize Ekanth Shinde On Bharat Gogawale Aghori Puja : महाराष्ट्रात सध्या अघोरी पूजेवरून राजकारण रंगतंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून शिंदे गटावर (Ekanth Shinde) निशाणा साधला आहे. राऊत यांनी म्हटलंय की, शिंदेंचा एक गट आहे, जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. तो गट सर्वत्र असतो. त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ते दिवस-रात्र अघोरी विद्येत (Bharat Gogawale Aghori Puja) असतात. राज्याचे नुकसान कसे होईल, आमचा फायदा कसा होईल, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

पुरोगामी पणाला डाग

मागील काही दिवसांपासून शिंदे सेनेचे मंत्री हे अघोरी पूजा करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. गोगावलेंचे अघोरी पुजा करत असतानाचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ही अंधश्रद्धा जरी असली, तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात आपण पुरोगामी म्हणून मिरवतो. त्या आमच्या पुरोगामी पणाला डाग लागणारी कृती आहेत. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल, तर हे शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचा दुर्दैव असं देखील राऊतांनी म्हटलंय.

देशात D कंपनीचं राज्य! गुंड, पुंड , झुंड, देशद्रोही… त्यांचे हस्तक; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्राला काळीमा फासणारी कृती

कोणत्या प्रकारची माणसं देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत, हे त्यांनी खुर्चीवर बसण्याआधी खाली वाकून पाहावं, असा टोला देखील राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृती आहे. अंधश्रद्धेविरुद्ध महाराष्ट्राने कायम लडा दिला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मंत्र्यांचे पीए जसे ते तपासून घेतात, तसे त्यांनी मंत्री देखील तपासून घेतले पाहिजेत. आघोरी नेते महाराष्ट्राचं काय भलं करणार, असा देखील सवाल त्यांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या बंगल्यात मोठा स्फोट, आग लागून किचन खाक

अघोरी विद्येचे प्रकार

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा. यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एसएमसी गटाची लोक करत आहेत. जनतेच्या कल्याणाचं यांना काही पडलेलं नाही, लोकशाहीशी पडलेलं नाही. एसएमसी गटाच्या मंत्र्यांना या आघोरी उपक्रमाद्वारे भाजपाच्या प्रमुख नेत्यांना एलिमिनेट करायचं आहे. व्हिडिओ समोर आले आहेत. ते त्यासाठीच सुरू आहेत, हे वेगवेगळ्या भागात सुरू आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube